अहमदाबाद बहुजननामा ऑनलाईन – आंतरजातीय विवाह केल्यानंतर पत्नीला तिच्या घरून परत आणण्यासाठी पोलिसांची मदत घेऊन दलित दलित तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना ८ जूलै रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील वारमोर येथे घडली. या घटनेत पोलीसही जखमी झाले आहेत.
हरीश सोलंकी (वय २५) असे हत्या करण्यात आलेल्या दलित तरुणाचे नाव आहे.
६ महिन्यांपुर्वीच केले होते लग्न
हरिश सोलंकी हा दलित जातीतील तरुण आहे. तो आणि गावातील उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील उर्मीला कादी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते. ६ महिन्यांपुर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. हरेश सोलंकी हा कच्छ जिल्ह्यातील गांधीधामचा रहिवासी आहे.
गोड बोलून तिला माहेरी नेले
हरीश दलित असल्याने उर्मिलाच्या कुटुंबियांचा त्याला विरोध होता. परंतु दोघांनी लग्न केले. त्यानंतर त्यांना हे लग्न मोडायचे होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी गोड बोलून तिला माहेरी नेले. तिला पुन्हा पाठवू असे सांगण्यात आले. मात्र तिला परत पाठवले नाही.
अभयम महिला हेल्पलाईनची मदत
उर्मिला दोन महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे तिला कुटुंबियांनी नेल्यानंतर परत पाठविले नाही म्हणून त्याने सोमवारी गुजरात सरकारच्या अभयम १८१ या हेल्पलाईनची मदत घेतली.
नेमकं काय घडलं त्या दिवशी ?
हरीशने अभयम १८१ या हेल्पलाईनची मदत घेऊन थेट सासूरवाडी गाठली. त्यावेळी तो हेल्पलाईनच्या गाडीतच समुपदेशक आणि पोलिसांसोबत वरमोर येथे गेला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला गाडीतच बसवले आणि ते उर्मिलाच्या घरी गेले. त्यांनी उर्मिलाला परत पाठविण्यास सांगितले. ते बोलत असतानाच उर्मिलाच्या कुटुंबियांना समजले की, हरीश गाडीतच आहे. तेव्हा त्यांनी थेट गाडीवरच हल्ला केला. १० लोकांनी धारदार हत्यारं घेऊन त्याच्यावर हल्ला चढविला. तेव्हा तेथे असलेले पोलीस आणि अभयम पथकातील अधिकारी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. मात्र पोलिसांसमोरच हरीशचा खून करण्यात आला. या घटनेत हरीशचा खून तर झालाच परंतु पोलीसही जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
उर्मिलाच्या कुटुंबियांना हे लग्न मोडायचे होते. त्यामुळे त्यांनी मुलीला घरी नेले. त्यानंतर ते परत पाठवत नव्हते. त्यामुळे हरीश सोलंकीने १८१ महिला हेल्पलाईनशी संपर्क साधला. या घटनेनंतर ते घरी गेले परंतु काऊंसलींग झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी खून, एट्रॉसिटी, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कुटुंबियिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अहमदाबादचे डीएसपी प्रविण कुमार मीना यांनी दिली.
Ahmedabad: A Dalit man Haresh Kumar Solanki murdered allegedly by his upper-caste in-laws in Varmor village on July 8. Police say, "family of the woman wanted to break the marriage. They called their daughter home&didn't let her return. They invited victim to have talks".#Gujarat pic.twitter.com/aYiB4yNw6n
— ANI (@ANI) July 10, 2019
DSP Praveen Kumar Meena: Victim called 181 women's helpline for counselling with family.But after counselling ended, he was attacked by the family. Police personnel were also attacked. Offence of murder, attack on public servants, criminal conspiracy, & under SC-ST Act registered https://t.co/xFbovR4kHM
— ANI (@ANI) July 10, 2019