बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या तीन मे रोजी संपणार आहे. मात्र, मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. दोन्ही शहरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरात 18 मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील विविध शहरात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणे हा लॉकडाउन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. पण त्यांचा फैलाव कमी होत नसेल तर आम्हाला लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल असे टोपे फोनवरुन लाइव्ह मिंटशी बोलताना म्हणाले आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांतील लॉकडाउन वाढविण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. मागील सव्वा महिन्यांपासून दोन्ही शहरांतील नागरिक घरामध्ये बसून आहेत.