बहुजननामा ऑनलाईन टीम : दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथील बदलापूर भागातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने आई रात्री पाणी आणि तंबाखूसाठी जागवायची या शुल्लक कारणाने आपल्या आईची गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. वास्तविक, ग्रेटर नोएडाच्या बदलापूर भागात शनिवारी एका ५० वर्षीय महिलेचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस झाला. हत्या झाल्यानंतर तिचा १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा घरी उपस्थित होता. त्याने स्वत: फोन करून आपल्या आईच्या हत्येबद्दल वडिलांना माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
या प्रकरणाची चौकशी करत असताना मुलाने घटनेच्या वेळी आपण झोपल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला हत्येचा पत्ता लागला नाही असे सांगून पोलिसांची दिशाभूल केली. परंतु घरात चोरी झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांना मुलावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी ताकीद दिल्यानंतर आरोपीने हत्येची कबुली दिली.
हत्येमागचे कारण विचारले असता, आई रोज रात्री जेवण करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी आणि तंबाखूसाठी उठवत असे, यामुळे त्याला बर्याच वेळा जागे राहावे लागत असे. यातून सुटका करण्यासाठी आपण आईची गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान, आरोपीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या वेळी आपण लग्नसमारंभास गेलो होतो.तर मोठा मुलगा गार्ड असल्याने तो ड्युटीवर होता. त्यावेळी लहान मुलाने आपल्याला फोनकरून हत्येची माहिती दिली. तसेच एका महिन्यापूर्वी आपल्या लहान मुलाला साप चावल्याने तो चिडचिड करू लागला होता.
Visit : bahujannama.com