मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटू लागलं आहे. भारतीय जनता पक्षानंही या मुद्यावरुन राज्य सरकारला घेरण्याची तयारी चालवली आहे. यापुढं मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचं भाजपनं जाहीर केलं आहे. त्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यामध्ये आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीची वेळ न दिल्याच्या मुद्याची भर पडली आहे.
महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. pic.twitter.com/L9I3AC664C
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 25, 2021
मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्याची भूमिका घेतली जात आहे. याच मुद्यावर बोलताना चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासंदर्भात निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होऊ, असं सांगत पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार संभाजीराजे भोसले यांना भेट घेण्याची वेळ का दिली नाही याबाबत विचारण्यात आले होते. त्यावर पाटील यांनी भूमिका मांडली. चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेतील एका मुद्यावर बोट ठेवत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सवाल केला आहे.
चंद्रकांत दादा,
प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. pic.twitter.com/RsCxq6EyE8— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 25, 2021
चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पहात होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या ? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारं आहे, अशी टीक सावंत यांनी केली आहे.