मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर १ जूननंतर लॉकडाऊन उठणार का असा लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे सध्या कोरोना रुग्णाची संख्या देखील घटत आहे. यावरून आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याची शक्यता ठाकरे सरकारकडून होत असल्याचे समजते. राज्याच्या परिस्थितीचा विचार करता त्यावर राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात टप्याटप्याने अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात करण्याचा विचार सुरू आहे. प्लॅनमध्ये काही निर्णय झाला तर १ जूनपासून राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करेल. राज्यात ४ टप्प्यात अनलॉक सुरू होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकानांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तर तिसऱ्या टप्प्यात रेस्टॉरंट, बार आणि वाईन शॉप उघडण्याची परवानगी देऊ शकतं. सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून याठिकाणी SOP लागू केली जाऊ शकते. रेस्टॉरंटमध्ये किती क्षमता असावी हे या निर्णयात असू शकतं. तसेच, चौथ्या टप्प्यात सरकार लोकल सेवा आणि धार्मिळ स्थळं उघडण्याची परवानगी देऊ शकते. मात्र, अनलॉक करताना सरकार १० वेळा विचार करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले आहेत. म्हणून १ जून पासून राज्य सरकार दुकानं उघडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकतं असा विश्वास दुकानदारांना आहे. जर सर्वकाही ठीक राहिलं तर चौथ्या टप्प्यात बाकी गोष्टींवरील सर्व निर्बंध उठवण्याची शक्यता आहे. असे समजते.
या दरम्यान, १ जूननंतर राज्य शासनाकडून राज्यातील दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु हे दुकाने उघडण्यासाठी काही वेळ दिल्या जाणार आहेत. आता अनेक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडले जाते. तर मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किराणा माल, पावसाळ्यासाठी लागणाऱ्या सामानाची दुकानं उघडण्यासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दुकाने उघणाऱ्या कालावधीत काही नियमने देखील लावण्यात येणार आहे.