बहुजननामा ऑनलाईन – भारतीय डाक (Post Office) विभागाने आता एक नवीन योजना गुंतवणूकदारासाठी आणली आहे. अशा प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना (Scheme) गुंतवणूकदारांसाठी उत्तम ठरू शकते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं. पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत. ज्यात पैसे भरल्यास ती दुप्पटही होते. हि योजना म्हणजे किसान विकास पत्र स्कीम (Kisan Vikas Patra Scheme). या स्कीममध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही. असे सांगण्यात आले आहे.
तर किसान विकास पत्र योजना ही भारत सरकारद्वारे जारी करण्यात आलेली एक वेळ गुंतवणूक योजना (One time investment scheme) आहे. ही योजना भारतातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. तर यामध्ये मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत मिळते. यामध्ये किमान शंभर हजार रूपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या रकमेला कोणतीही कमाल मर्यादा नाही. मुख्यत: ही योजना शेतकऱ्यांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. जेणेकरून ते मोठ्या कालावधीसाठी आपले पैसे वाचवू शकतील.
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) या स्कीमचा मॅच्युरिटी पिरअड १२४ महिने म्हणजेच १० वर्ष ४ महिने इतका आहे. तर या स्कीममध्ये गुंतवल्यास १२४ महिन्यांमध्ये ही रक्कम दुप्पट होईल. दुसऱ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत यावर ६.९ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर गुंतवणूकदाराने यामध्ये १ लाख रूपयांची गुंतवणूक करता तर मॅच्युरिटी कालावधीपर्यंत ही रक्कम दोन लाख रूपये होईल. यामध्ये जमा रकमेवर जे व्याज देण्यात येतं त्याच आधारावर ही रक्कम दुप्पटही होत जाते. जर कर्ज घ्यायचं असेल तर त्यावर अल्प व्याजदरात कर्जही उपलब्ध करून देण्यात येतं. समजा कोणत्याही आर्थिक अडचणीत असाल आणि तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक केली असेल तर यावर कर्ज घेऊन तुम्ही आर्थिक अडचण दूरही करू शकता. यासंदर्भात पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहितीत दिली आहे.