बहुजननामा ऑनलाईन : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यावरून वाद उभा राहण्याची शक्यता आहे. काश्मीर मुद्द्यावरून त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते कि,काश्मीरच्या बाबतीत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याकडून मोठा गुन्हा घडला होता.
मोदी आणि अमित शहा यांनी नेहरूंची चूक सुधारली
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी ओरिसामध्ये जे बोललो होतो ते पूर्ण जबाबदारीसह बोललो होतो. नेहरू यांच्याकडून जी चूक झाली होती ती मोदी आणि शहा यांनी सुधारली. त्याचवेळी मोदी-शहाचे कौतुक करताना शिवराज म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना फक्त माझा नेता मानत होतो मात्र त्यांच्या या निर्णयानंतर मी त्यांची पूजा करतो.
शिवराज म्हणाले की, मी देशातील सर्व महापुरुषांचा आदर करतो, पण माझ्यासाठी राष्ट्र सर्वोपरि आहे. एखाद्याने राष्ट्रावर केलेला गुन्हा हा सर्वात मोठा गुन्हा आहे. मी सत्यतेने बोलतो. नेहरूंवर हा गुन्हा घडला आहे. नेहरूंनी शेख अब्दुल्लावर इतके प्रेम का केले, हे मला ठाऊक नाही. ते म्हणाले की, शेख अब्दुल्ला यांच्या सांगण्यावरून त्यांनी राज्याला विशेष दर्जा दिला. तत्कालीन कायदामंत्री भीमराव आंबेडकर यांनी कलम ३७० ला स्पष्टपणे नकार दिला, परंतु पंतप्रधान नेहरूंनी त्यांचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला आणि अय्यंगार यांनी अनुच्छेद ३७० चा मसुदा तयार केला. ते म्हणाले की नेहरूंनी आणखी एक चूक केली होती. १९६२ च्या युद्धानंतर नेहरू सभागृहात म्हटले होते की लडाखमध्ये गवत पेंढादेखील उगवत नाही, तेव्हा त्यांच्याच मंत्री महावीर यांनी सभागृहात नेहरूंचा विरोध केला होता.
काँग्रेस दिग्विजयसिंह सारख्या नेत्यांमुळे डुबणार
सोनिया गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपद निवडीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि,मला दिग्विजय सिंह सारख्या लोकांची कीव येते. ते फक्त हिंदू मुस्लिम मुद्दाच उचलतात. त्यांच्या या मानसिकतेमुळेच ते हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये फूट पाडतात. त्याचबरोबर त्यांच्यासारख्या लोकांमुळे काँग्रेस आणखी डुबणार अशी टीकादेखील केली. उल्लेखनीय आहे की ईदनिमित्त मुस्लिमांमध्ये पोहोचलेले माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये आज संकट आहे, असे दिग्विजय यांनी मुस्लिमांना सांगितले, तेथे बंधुत्व कायम राहावे अशी प्रार्थना करा. काश्मीरचे सत्य लपविले जात आहे. युट्युब वर जा आणि आपल्याला तेथे काय चालले आहे हे कळेल.