बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण अशावेळी बजेट सारदर करत आहेत, जेव्हा यावर्षी अर्थव्यवस्थेत सुमारे आठ टक्केची घसरण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे हे बजेट महत्वापूर्ण आहे. अर्थतज्ज्ञांनुसार यावेळी बजेटकडून अर्थव्यवस्था आणि बाजारांशी संबंधीत 21 प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, ज्यांची दिर्घ कालावधीपासून प्रतिक्षा केली जात आहे. जर, अर्थमंत्र्यांनी संतुलित बजेट सादर केले तर अर्थव्यवस्था वेग पकडेल. यामुळे देशात वाढलेली बेरोजगारी नियंत्रणात आणणे आणि बाजरात मागणी वाढवण्यास मदत होईल.
हे आहेत ते प्रश्न
1. शेयर बाजारात तेजी कायम राहील का?
2. परदेशी गुंतवणुकदार कुठपर्यत टिकतील?
3. गोल्ड, सिल्व्हर कोणत्या दिशेने जाईल?
4. रुपया किती कमजोर होईल?
5. जॉब मार्केटमध्ये सुधारण कधीपर्यंत होईल?
6. गुंतवणुकीवर सवलतीची मर्यादा वाढेल का?
7. कुसुम योजनेचा विस्तार होईल का?
8. कृषीकर्जात वाढ होईल का?
9. वाहन स्क्रॅप पॉलिसी केव्हा लागू होईल?
10. बँकेत जमा रक्कमेवर जास्त व्याज केव्हा मिळेल?
11. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार की नाही?
12. बँकांची एनपीएची स्थिती किती वाढणार?
13. कोरोना सेस किती आणि कधी लागेल?
14. वरिष्ठ नागरिकांना जास्त रिटर्नचा पर्याय मिळेल का?
15. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने कोणती पावले उचलणार?
16. वर्क फ्रॉम होमसाठी कशाप्रकारची सूट मिळेल?
17. छोट्या उद्योगांना काही दिलासा मिळणार का?
18. शहरी घरकुल योजना आणि भाड्याच्या घराच्या योजनेत किती प्रगती?
19. स्वयंरोजगार आणि कौशल्य विकाससाठी कोणती पावले असतील?
20. विक्री वाढवण्यासाठी एलटीसी सारखी योजना पुन्हा येईल का?
21. आरोग्याच्या सुरक्षेसाठी कोणती नवीन पावले उचलणार?