बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने आज कलम ३७० जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे हे कलम हटवण्याचा ऐतिहासिक घेतला. काँग्रेस पक्षाला हा निर्णय न पटल्यामुळे त्यांनी या निर्णयाला विरोध केला. काँग्रेसचे राज्यसभा खासदार भुवनेश्वर कलिता याना पक्षाची ही भूमिका अजिबात पटली नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने आपला राजीनामा दिला आहे.
त्यांच्या या निर्णयासंदर्भात बोलताना कलिता यांनी सांगितले की आज पक्षाने मला काश्मीर मुद्द्याबाबत व्हीप जारी करण्यास सांगितले होते. पण देशातील परिस्थिती बदलली आहे. हा व्हिप देशातील जनभावनेविरोधात ठरला असता, हे वास्तव आहे. असे त्यांनी सांगितले.
पंडित जवाहर लाल नेहरू यांनी कलम ३७० ला विरोध केला होता आणि एक दिवस हे कलम संपुष्टात येईल असे सांगितले होते. काँग्रेसच्या विचारावरून असं वाटत की सध्या पक्ष आत्महत्या करत आहे. त्यामुळे यामध्ये मला काँग्रेसचा भागीदार बनायचं नाही आणि मी व्हिपचे पालनही करणार नाही. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. कलिता यांनी सांगितले.