धुळे बहुजननामा ऑनलाइन : खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे राज्यात आता नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे राणे भाजपमध्ये जातील अशीही चर्चा सुरू झाली आहे. असं झालं तर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचं काय होणार याबाबत तर्क लढवले जात होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत त्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
मला नारायण राणेंनी यांनी एका पुस्तक प्रकाशनाला बोलावलं होतं. पण त्यांना वेळेत जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्यासोबतच आहेत. राणेंनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चा करुन घेतला असं स्पष्टिकरणही त्यांनी दिला. नारायण राणेंना आपला पक्ष भाजपात विलीन करायचा आहे असा खुलासाही त्यांनी केला. सर्व घटक पक्षांना आम्ही सामावून घेऊ असं सांगत त्यांनी घटक पक्षांना दिलासा दिला आहे. असे, मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात देवेंद्र आणि दिल्लीत नरेंद्र अशी घोषणा राज्यात कायम दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आपलं स्थान मजबूत केलं आहे. महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज सगळ्यांनाच धक्का दिला आहे. मी काही काळ राज्यात आहे. मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलंय. मुख्यमंत्री म्हणाले, आमची परीक्षक जनता आहे.लोकांना आमच्यावर विश्वास आहे. महाजनादेशाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आमच्या यात्रेनंतर इतर पक्षांनी यात्रा काढावी वाटली. विरोधकांच्या यात्रांना प्रतिसाद नाही उदयनराजे पक्षात आले तर आनंद, आम्ही त्यांचे स्वागत करु. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरग्रस्त स्थिती बद्दलही माहिती दिली. पूरग्रस्त भागासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. अमित शाहांशी पूरग्रस्त भागाबद्दल चर्चा केली. सांगली, कोल्हापूर आणि सातारा भागातील जनता आमच्या पाठीशी आहे. पूराचा विधानसभा निवडणूक निकालावर परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.