बहुजननामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) : ग्रामस्थ व शिक्षकांच्या कल्पकता आणि इच्छाशक्तीतून पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौंडकरवाडी शाळेचा कायापालट झाला आहे.शाळेचे नेहमीचे स्वरूप आमूलाग्र बदलले असून शाळा गुणवत्ता व विद्यार्थी संख्येने बहरली आहे. हे सर्व बदल करण्यामध्ये मुख्याध्यापक अनिल कड यांचा मोलाचा वाटा आहे. शाळेत काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे यासाठी मुख्याध्यापक अनिल कड यांनी पालकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने योग्य नियोजन केले.त्यामुळे शाळेचा कायापालट झाला असून त्याचे चांगले फळ आज पाहावयास मिळत आहे.
ही शाळा परिसरात आदर्श म्हणून ओळखली जात असून नवनवे उपक्रम मोठय़ा उत्साहाने येथे राबविले जातात.बालवयातच मुलांवर संस्कार करण्याचे कार्य ही शाळा प्रभावीपणे करीत आहे. शाळा गुणवत्ता व विद्यार्थी संख्येने बहरली आहे. परिसरातील ग्रामस्थ,पालक यांच्या सहकार्याची जोड घेऊन मागील काही वर्षापासून गुणवत्ता विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले.यातून शाळेच्या गुणवत्तेचा व पटसंख्येचा आलेख हळूहळू वाढलेला असून आज शाळा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.
विद्यार्थी हेच दैवत व सर्वांगीण विकास हाच द्यास म्हणून अवरीत झटणारे शिक्षक अनिल कड यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून सन २०१८-१९ मध्ये २ विद्यार्थी तर सन २०१९-२० मध्ये ४ विद्यार्थी इंग्रजी माध्यम सोडून जिल्हा परिषद शाळा चौंडकरवाडी दाखल झाले. शाळेच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग मोलाचा आहे.भौतिक सुविधा इतर शाळेच्या कोणत्याही कामात पालक व ग्रामस्थ नेहमी अग्रेसर असतात. ग्रामस्थां बरोबर चंद्रकांत चौंडकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे मुख्याध्यापक अनिल कड यांनी सांगितले. शाळेत इ लर्निंग,डिजिटल लर्निंग,पाढे,फेनिक पाठांतर,सुंदर हस्ताक्षर,इंग्रजी वाचन,अंकखेळ,अक्षर गाड्या व इतर उपक्रम घेऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते. मुख्याध्यापक अनिल कड त्यांच्या संकल्पनेतून, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे खऱ्या अर्थाने ही शाळा आदर्श शाळा म्हणून पुढे येत असून त्यांना नविन आलेले सहशिक्षक कृष्णा लवांडे व केंद्रप्रमुख रोहिदास कोलते यांचे सहकार्य मिळत आहे.