बहुजननामा ऑनलाइन टीम –
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांडमध्ये असलेल्या ज्ञानपुरी-बंसरीचे चिप्स भारतातील काही भागात 5 हज़ार रुपये किलोपर्यंत विकले जात आहेत. परंतु, भारतीय सीमा ओलांडताच याची किंमत 2 लाख रुपये किलोपर्यंत जात आहे. यूपी एसटीएफ चिप्स बनवणार्यांचा शोध घेत आहे. कासव तस्करांच्या मागे लागलेल्या टीमच्या माहितीनुसार आता या प्रकरणात इंटरपोल सुद्धा सक्रिय झाले आहे.
यूपीच्या इटावा आणि पश्चिम बंगालच्या 24 परगनामध्ये हे खास चिप्स तयार केले जात आहेत. ज्ञानपुरी-बंसरी एक ठिकाण आहे, याच नावाने कासवांच्या तीन विशेष प्रजातींना ज्ञानपुर-बंसरी म्हटले जाते. हे सर्वात जास्त इटावामध्ये आढळतात. हा परिसर राष्ट्रीय चंबळ सेंच्यूरीमध्ये येतो. असे असूनही येथे मोठ्या संख्येने कासवांची तस्करी होत आहे.
पर्यावरणवादी आणि गंगा अभियानात सक्रिय असलेले राजीव चौहान यांनी या तस्करीचा खुलासा करताना सांगितले की, चंबळ नदीच्या किनार्यावरील आग्राच्या पिनहाट आणि इटावाच्या ज्ञानपुरी आणि बंसरीमध्ये निलसोनिया, गँगटिस आणि चित्रा इंडिका या तीन कासवांच्या अशा प्रजाती आहेत, ज्यांचा वापर चिप्स बनवण्यासाठी केला जातो. कासवाच्या पोटाच्या स्किनला प्लॅस्ट्रान म्हटले जाते. याच प्लॅस्ट्रानच्या चिप्स बनवल्या जातात.
प्लॅस्ट्रान कापून वेगळे केले जाते. नंतर हे उकळवून सुखवले जाते. यानंतर हे बंगालच्या मार्गे परदेशात पाठवले जाते. उन्हाळ्यात प्लॅस्ट्रानच्या चिप्स बनवल्या जातात, तर हिवाळ्यात जिवंत कासवांची तस्करी केली जाते. कारण, हिवाळ्यात तस्करी करण्यात कोणताही अडथळा येत नाही.
या देशात लाखो रूपयांनी विकले जातात चिप्स
राजीव चौहान यांच्यानुसार, स्थानिक तस्कारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासव पकडणारे आणि त्यांचे चिप्स बनवणारे 5 हजार रुपये किलोच्या हिशेबाने ज्ञानपुरी आणि बंसरीमध्ये पकडलेली निलसोनिया, गँगटिस आणि चित्रा इंडिका कासवांचे चिप्स विकतात. इटावा-पिनहाटमधून हे चिप्स 24 परगना येथे पोहचतात. येथून थायलँड, मलेशिया आणि सिंगापुरला तस्करी केली जाते.
तस्कारांनुसार, या तीन देशात पोहचताच हे चिप्स 2 लाख रुपये किलोपर्यंत विकले जातात. एक किलो वजनाच्या कासावातून 250 ग्रॅमपर्यंत चिप्स काढले जातात. भारतात ज्याप्रकारे सक्ती केली जात आहे, त्यामुळे आता तस्करी थोडी कमी झाली आहे, यामुळे आता इंटरनॅशनल बाजारात चिप्सचे दर 2 लाखांपेक्षा सुद्धा जास्त झाले आहेत.
चिप्स खाणे आणि सूप पिण्यामागे ही आहे धारणा
राजीव चौहान यांनी सांगितले की, जेव्हा तस्करांकडून कासवांच्या तस्करीचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, थायलँड, मलेशिया आणि सिंगापुरसह अनेक देशात हे सेक्स पावर वाढवण्यासाठी सेवन केले जाते. हे चिप्स चिप्स पापडप्रमाणे सुद्धा वापरले जाते आणि उकळवून सूप सुद्धा बनवले जाते. तर याचे मांस पश्चिम बंगालमध्येच 400 रुपये किलोपर्यंत विकले जाते.