नवी दिल्ली वृत्तसंस्था – दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद मानवतेच्या विरोधात असतो. मात्र कॉंग्रेसने दहशतवादाला धर्माशी जोडले. असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत केले. राज्यसभेत युएपीए विधेयकावर चर्चा सुरु असताना कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचं वातावरणं तयार झालं आहे. युएपीए विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर आज राज्यसभेत विधेय़कावर चर्चा सुरु आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या युएपीए विधेयकानुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्य होणार आहे. दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात असतो. युएपीएची भिती कशासाठी वाटते. असा सवाल अमित शहा यांनी विरोधकांना विचारला.
यावेळी कॉंग्रेसचे खासदार पी. चिदंबरम यांनी विधेयकाला विरोध केला. एनआयला बळ देण्यासाठी या विधेयकात उल्लेख आहे. तर दुसरीकडे केंद्राला बळ देत एखाद्या व्यक्तीचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याचा किंवा काढण्याचा हक्क दिला गेला आहे. विधेयकात आणलेल्या या खोडसाळपणाला आमचा विरोध आहे. आम्ही बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालणाऱ्या विधेयकाला विरोध करत नाही. असं चिदंबरम यांनी यावेळी स्पष्ट केलं.
P Chidambaram in RS: If you see reasons for amendment, it says 'to empower NIA'.In passing you say 'empowers Centre to add or remove an individual's name as a terrorist', this mischief is why we are opposing this amendment, we are not opposing Unlawful Activities (Prevention) Act pic.twitter.com/mhnd8cmjfZ
— ANI (@ANI) August 2, 2019
त्यासोबतच कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील भाजपच्या हेतूवर संशय व्यक्त करत कायद्याला विरोध केला आहे. कॉंग्रेसने दहशतवादाशी कधीच तडजोड केली नाही. म्हणूनच आम्ही कायदा आणला होता. तुम्हीच रुबैय्या सईद आणि मसूद अजहरची सुटका करण्याच्यावेळी दहशतवादावर तडजोड केली. असा आरोप केला.
Home Minister Amit Shah in Rajya Sabha: Chidambaram ji asked why to name an individual as a terrorist when the organization they are affiliated to is already banned. It is because we ban one org, another one comes up by same individuals. Till when will we keep banning orgs? #UAPA pic.twitter.com/0inu9k8Zzx
— ANI (@ANI) August 2, 2019
त्यावर अमित शहांनी उत्तर दिलं. तेव्हा ते म्हणाले, संघटनेवर बंदी असताना पुन्हा एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित का करावं अशी विचारणा चिदंबरम करत आहेत. कारण आपण एखाद्या संघटनेवर बंदी आणली आहे. परंतु तीच व्यक्ती दुसरी संघटनाही स्थापन करते. मग आपण कधीपर्यंत संघटनांवर बंदी आणत राहायचं ? असे अमित शहा म्हणाले. आणीबाणीच्या काळात काय झालं होतं ? आपला भूतकाळ तपासून पाहा. सर्व प्रसारमाध्यमांना बंदी होती. सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबलं गेलं होतं. गेल्या १९ महिन्यात कोणतीही आणीबाणी लागू नाही. तुम्ही आमच्यावर या कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप करत आहात. अशी टिका अमित शहा यांनी केली.
HM Amit Shah: Digvijaya Singh ji seems angry, it is natural, he just lost elections…he said 'in 3 cases of NIA no one was punished.' I will tell you why, because earlier in these cases political vendetta was done&attempt was made to link a particular religion to terror #UAPA pic.twitter.com/h1VI1AIhYh
— ANI (@ANI) August 2, 2019