नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Central Government । जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर जमीन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला. केंद्र सरकारने (Central Government) जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कलम 370 आणि 35 अ हे 5 ऑगस्ट 2019 रोजी काढून टाकण्यात आलं. यांनतर जमीन खरेदी (Land purchase) करण्यास परवानगी मिळाली. सध्या भारतातील कुठलीही व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकते. याबाबत किती जणांनी जमीन खरेदी केलीय. याबाबत माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सध्या चालू असणाऱ्या पावसाळी अधिवेशन (Rainy convention) दरम्यान, लोकसभेत केंद्राने सर्वांसमोर माहिती उपलब्ध केली आहे. सध्या सुरु असणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज याबाबतची माहिती देण्यात आलीय. लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Union Home Minister of State nityanand rai) यांनी ही माहिती दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Union Home Minister of State nityanand rai) यांनी लोकसभेतील एक प्रश्नाच्या लिखित उत्तरात महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, जम्मू आणि काश्मीर सरकारने दिल्या गेलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 पासून जम्मू-काश्मीरसोडून बाहेरच्या अवघे दोनच व्यक्तींनी आतापर्यंत संपत्ती खरेदी केली आहे. जम्मू-काश्मीरला लागू असलेलं 370 कलम रद्द केल्यानंतर खरेदी करण्यास बाहेरच्या व्यक्तींना देखील मुभा असणार आहे.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवले.
जम्मू-काश्मीर राज्याचे लडाख आणि जम्मू काश्मीर असे २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं.
काश्मीर खोऱ्यात लष्करी तैनात मोठ्या संख्येने वाढवण्यात आले.
हिंदूंच्या मोठ्या धार्मिक यात्रा थांबवण्यात आल्या. शाळा आणि कॉलेजेस बंद केली गेली.
पर्यटकांना निघून जाण्यास सांगितलं.
फोन आणि इंटरनेटची सुविधा बंद करण्यात आली आणि स्थानिक राजकीय नेत्यांना कैद करण्यात आलं होतं.
Web Title :- Central Government | how many people bought land in jammu and kashmir after repealing article 370
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Indo-Tibetan Border Police | कडक सॅल्यूट ! उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून PI वडिलांनं केला ‘सलाम’