नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL (Bharat Sanchar Nigam Ltd) च्या कर्मचार्यांना सप्टेंबर महिन्यापूर्वी वेतन मिळणार आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवर म्हणाले की, दिवाळी सणापूर्वी कंपनी आपल्या स्रोतांच्या माध्यमातून कर्मचार्यांना पगार देईल. सेवांच्या माध्यमातून कंपनीला दरमहा १, ६०० कोटी रुपये मिळतात. त्याचबरोबर महिन्याला वाटलं जाणारा पगाराचा खर्च ८५० कोटी रुपये इतका आहे. परंतु कंपनीचा परिचालन खर्च खूप जास्त आहे. टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड चे वित्त वर्ष २०१९ मध्ये १३, ८०४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
पुरवर म्हणाले की, ४ जी स्पेक्ट्रमची उपलब्धता आणि वोलंटरी रिटायरमेंट योजनेतील कर्मचार्यांची संख्या (VRS) कमी केल्याने आर्थिक चिंता कमी होईल, परंतु ते सरकारच्या पसंतीच्या यादीमध्ये असले तरी यास वेळ लागेल.
१] अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी ५०,००० कोटी रुपयांचे भांडवल गुंतविण्याच्या बाजूने आहेत.
२] याशिवाय पुढील आठवड्यात बीएसएनएल-एमटीएनएलच्या पुनरुज्जीवन योजनेवर चर्चा होऊ शकते.
३] मंत्रिमंडळ बैठकीत १३ हजार कोटींच्या VRS योजनेवर करार होणे अपेक्षित आहे.
कसा मिळणार पगार
१] BSNL च्या पगारावर मासिक खर्च ८५० कोटी रुपये आहे. सूत्रांनी सांगितले की कंपनीला दरमहा १,६०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो.
२] परंतु ही रक्कम पगारासाठी पुरेशी नाही. कारण त्यातील बराचसा भाग ऑपरेटिंग खर्चामध्ये खर्च केला जातो.
३] BSNL बँकांकडून सरकारी गॅरंटीद्वारे निधी जमा करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
Visit : bahujannama.com