नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – अकोला जिल्ह्यातील (Akola District) एका विनयभंगाच्या प्रकरणावर सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) एक महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले. विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे (Throwing love letters) किंवा शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंग असल्याचा महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयानेही (Bombay High Court) दोषी ठरवले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या खटल्याची पार्श्वभूमी अशी कि, 2011 मध्ये एका 54 वर्षीय व्यक्तीवर अकोला येथील एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केला होता. पीडित महिलेने आरोपीने दिलेली एक चिठ्ठी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने ती चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असं तो तिला म्हणाला. कोणाला न सांगण्याची धमकी देखील दिली. या घटनेनंतर पीडितेने सिव्हिल लाइन्स पोलिसांमध्ये (Civil Lines Police) तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 2 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र आरोपीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली.
त्यावेळी न्यायालयाने सांगितले की, ‘एखाद्या महिलेची अब्रू हा तिचा सगळ्या मोठा दागिना आहे.
त्यामुळे तिचा विनयभंग झाला की नाही हे ठरविण्यासाठी एखादे सरसकट समीकरण लागू करता येणार नाही.
विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे किंवा शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंग आहे असे सांगत आरोपीला दोषी ठरविले.
Web Title :- Bombay High Court | love letter throw on married women is crime says nagpur bench of mumbai high court
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी
Maruti Alto वर मिळत आहे 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट! जाणून घ्या पूर्ण डिटेल