नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) ने पॅकेज्ड वॉटर आणि मिनरल वॉटर उत्पादकांसाठी नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. पॅकेज्ड वॉटर आणि मिनरल वॉटर उत्पादकांना परवाने मिळविण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र ( BIS) बंधनकारक केले आहे. ज्या अंतर्गत 1 एप्रिलपासून मिनरल वॉटर विक्री करणाऱ्या कंपन्यांना बीआयएस प्रमाणपत्र अनिवार्य केले जाईल. एफएसएसएएआयने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आयुक्तांना या संदर्भात एक पत्र पाठविले आहे. यात त्यांना बाटलीबंद पाणी बनविणाऱ्या कंपन्यांचे बीआयएस प्रमाणपत्र बंधनकारक करण्यास सांगितले आहे. हे निर्देश 1 एप्रिल 2021 पासून अंमलात येतील.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी परवाना आवश्यक –
एफएसएसएएआयने म्हटले की, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2008 अन्वये, सर्व खाद्य व्यवसाय संचालकांना (एफबीओ) कोणताही खाद्य व्यवसाय सुरू करण्यापूर्वी परवाना / नोंदणी घेणे बंधनकारक असेल. नियामक म्हणाले की अन्न सुरक्षा आणि मानक (विक्रीवरील निर्बंध आणि निर्बंध) विनियम 2011 नुसार कोणतीही व्यक्ती बीआयएस प्रमाणन चिन्हानंतरच पॅकेज्ड वॉटर किंवा मिनरल वॉटर विकू शकते.
बाटलीबंद पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करा – एफएसएसएआयआयच्या या निर्णयामुळे पॅकेज्ड वॉटरची गुणवत्ता सुनिश्चित होईल. सध्या अशा अनेक कंपन्या आहेत ज्या बाटलीबंद पाणी विकतात. परंतु त्यांच्या गुणवत्तेची हमी दिलेली नाही. त्यामुळे लोकांच्या आरोग्यासही हानी होण्याचा धोका आहे.
परवाना नूतनीकरणासाठी देखील BIS आवश्यक – केवळ इतकेच नाही तर परवान्याच्या नूतनीकरणासाठी देखील बीआयएस परवाना आवश्यक असेल, बीआयएस परवाना नसणाऱ्या कंपन्यांच्या परवान्यांचे नूतनीकरणही केले जाणार नाही. तसेच बीआयएस परवाना मिळाल्यानंतरच फूड बिझिनेस ऑपरेटर ऑपरेटर वार्षिक रिटर्न ऑनलाईन भरू शकतील. एफएसएसएएआयचे हे आदेश 1 एप्रिल 2021 पासून अंमलात येतील.