नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहार विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहचली असताना भाजप नेतृत्व मात्र चिंतेत आहे. कारण विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष जेडीयूच्या नितीश कुमार यांची लोकप्रियतेचा आलेख घसरत आहे त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांना हाताळण्यात अपयश, पूर आणि कोरोना महामारीचा सामना करण्यात नितीश कुमार सरकार अपयशी ठरलं आहे. नितीश कुमार यांच्या घसरत्या लोकप्रियतेबाबत भाजपला माहिती नाही असे नाही, आरएसएस आणि भाजपने केलेल्या सर्व अंतर्गत सर्वेक्षणांमध्ये हे स्पष्ट झालं होतं की बिहारमधील लोक आता नितीशकुमारांना पसंत करत नाहीत. मोदी लाट पाहता बिहारमधील स्थानिक नेत्यांनी राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याचा नारा दिला होता.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जून-जुलैमध्ये बिहारमधील अनेक नेत्यांसोबत चर्चा केली अन नितीश कुमार यांच्याबरोबरच राहण्याचं निर्णय घेण्यात आला. कारण नितीशकुमार हे लालू यादव यांचा पक्ष आरजेडी, कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीत सामील होण्याचा धोका होता, म्हणून हायकमांडने नितीशसमवेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या प्रचाराला जसजसा वेग आला तसं नितीशकुमार यांच्या जेडीयूची लोकप्रियता घटत गेली.