भिवंडी : बहुजननामा ऑनलाईन – शिक्षा सुनावली म्हणून त्याने चक्क न्यायाधीशांवरच आरोपीने चप्पल भिरकावल्याचा भिवंडी न्यायालयातील प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम गुप्ता यांनी या आरोपीला दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अशरफ अन्सारी (वय,२३ रा. आमपाडा, भिवंडी) असं त्याच नाव असल्याचे सरकारी वकील विजय मुंडे यांनी सांगितले.
अशरफ अन्सारीवर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी भारतीय दंड विधान कलम ४५४, ३८०, ४५७, ३४ अंतर्गत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांच्या संदर्भात भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस.जे. पठाण यांच्यासमोर २९ जानेवारी २०१९ रोजी शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले होते. तुला गुन्हा कबूल असेल तर दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असं न्यायाधीशांनी आरोपी अशरफला सांगितलं. मात्र मी आधीच १४ महिने शिक्षा भोगली असून ती कापून मला सोडून द्यावं, अशी विनंती अशरफला केली होती. मात्र आणखी सहा महिने शिक्षा भोगावीच लागेल, असं न्यायाधीशांनी सांगताच अशरफला राग अनावर झाला. या रागातूनच त्याने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी त्यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.