पुणेः बहुजननामा ऑनलाईन – शहरात आता कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांनी आरोग्य विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. याबाबत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. धनंजय केळकर यांनी कोरोना वाढीची कारणे सांगितली आहेत. परदेशात निर्बंध उठवले, त्यातच थंडी वाढली आणि पुन्हा कोरोना आला. त्यामुळे त्याठिकाणी पुन्हा एकदा लॅाकडाउनची वेळ आली. आपल्याकडेही हा आलेख हळू -हळू वाढत आहे. जुन-जुलै महिन्यात पुन्हा कोरोनाची लाट येऊ शकते. त्यामुळे, सतर्क राहण्याची गरज असल्याचे डॉ. केळकर यांनी म्हटले आहे. ही सेकंड वेव्ह नाही. पण, ही आपल्यासाठी वॉर्निंग आहे, म्हणजे कोरोना अजूनही गेलेला नाही, असे ते म्हणाले.
मास्क न घालणे, शारीरिक अंतर न पाळणे, अनावश्यक गर्दी करणे, स्वच्छता न पाळण्याच्या बेफिकिरीमुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. पुण्यात रुग्णसंख्या 140 पासून वाढून रविवारी 300 च्यावर पोहचली आहे. पण जोपर्यंत वॅक्सिन नाही, तोपर्यंत सतर्क रहाणे आवश्यक आहे. लोकांनी सतर्कता पाळली तर एवढ्यात लॅाकडाउनची वेळ येणार नसल्याचे डॉ. केळकर म्हणाले. महापालिकेने टेस्टींग वाढवावे. कोरोना हा आपल्या सोबत राहणार आहे. हे लक्षात घेऊनच वागावे लागणार आहे. सध्या पुण्यात फक्त दोनच दवाखान्यात कोरोनाचे उपचार केल्याचा दावा करत डॉक्टर केळकर म्हणाले प्रत्येक रुग्णालयातकोरोना रुग्णांवर उपचार होणे आवश्यक आहे. तसेच, जर कुणालाही काही लक्षणे दिसली तर तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी नमूद केले आहे.