मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि अन्य दोघांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी( Anvay Naik Suicide Case ) न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. बाहेर या अटकेवरून राजकीय वातावरण तापलेले आहे.
तर अन्वय़ नाईक यांच्या आत्महत्येवर आवाज उठविणाऱ्या त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीचे खासगी आयुष्यातील फोटो भाजपाच्या आयटी सेलच्या पदाधिकाऱ्याने व्हायरल करत (naiks-wife-daughters-personal-photo-goes-viral) आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. यावर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (varun-sardesai) यांनी टीका केली आहे. तसेच महिलांच्या खासगी आयुष्यातील फोटो असे पोस्ट करण्यावर कारवाई करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh)यांच्याकडे केली आहे.
सतिश निकम नावाच्या अकाऊंटवरून आज्ञा अन्वय नाईक यांचे इन्स्टाग्रामवरील फोटोंचे स्क्रीनशॉट पोस्ट तयार केले आहेत. यामध्ये अन्वय नाईक यांच्या पत्नीचेही फोटो आहेत. तसेच या ट्विटरवरील पोस्टमध्ये नाईक यांची पत्नी आणि मुलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून टीका केली आहे. या ट्विटवर वरुण सरदेसाई यांनी आक्षेप घेत, भाजपाच्या आयटी सेलवाले काहीही पसरवत आहेत. मराठी माणसाच्या मागे उभे राहायचे सोडून हे असले सुचते कसे? असा सवाल करत निषेध व्य़क्त केला आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सायबर सेल व ट्विटरला टॅग करत या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांच्या खासगी आयुष्यातील फोटो तिच्या परवानगीशिवाय पोस्ट करण्यावर ही कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अर्णब आणि अन्वय यांच्यात का झाला वाद
गोस्वामी यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनी सोडली होती. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असे आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिले होते. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा तरी कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी 6 महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचे काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना 6 महिन्यांत काम पूर्ण न करता आल्याने अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेले काम काढून घेतले. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचे काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.
अन्यथा ते आज जिवंत असते…
इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना बुधवारी सकाली अटक केली आहे. यासंदर्भात आता, अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती. अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या वडिलांचे 83 लाख रुपये थकवले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीन सार्डा या 3 जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.