बहुजननामा ऑनलाईन – भारत सरकारने कलम ३७० हटविण्याच्या निर्णयामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. पाकिस्तान मात्र विरोध करत पेटले आहे. पण त्याच आगीत पाकिस्तानचेच हात पोळून निघत आहेत. पाकिस्तान कलम ३७० बाबत जगभरातून मदत मागत आहे. यावर अमेरिकेने पुन्हा दहशत वादावरून पाकिस्तान ला धारेवर धरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने पाकिस्तान ला चेतावणी दिली आहे. भारताच्या विरुद्ध दहशतवादावर वेळीच लगाम घाला. अथवा याचे परिणाम फार वाईट होतील. या संदर्भात अमेरिकेने भारताला माहिती दिली आहे. पाकिस्तान नेहमी सीमा रेषेवर सिजफायर चे उल्लंघन करत आहे. तसेच आतंकवादी टोळ्यांचे समर्थन देखील करत आहे.
जम्मू – कश्मीर च्या कलम ३७० बाबत घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान मध्ये खळबळ माजली आहे. याच मुद्द्यावर पाकिस्तान ने ज्वॉइंट सेशन बोलावले. ज्यात जोरदार हंगामा झाला. पाकिस्तानने संपूर्ण जगाला मदतीची मागणी केली आहे. परंतु कोणताच देश यासाठी समोर येण्यास तयार नाही. एवढेच काय पाकिस्तान चा मित्र चीन सुद्धा यापासून चार हाथ लांब आहे. अमेरिकेने याबाबत पाकिस्तान ला चांगलेच बोल सुनावले आहेत. भारताच्या विरुद्ध कोणतीही आक्रमक भूमिका घेऊ नका, असे सांगितलं आहे.
अमेरिकेने पाकिस्तान ला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तान ला सांगितले कि, तुम्ही आतंकवादी संगठनांना समर्थन देणे थांबवा. अन्यथा त्यांना फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स (Financial Action Task Force FATF) च्या ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येईल. FATF हि मनी लॉन्ड्रिंगच्या विरुद्ध काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. पाकिस्तान आधीच या संस्थेच्या ग्रे यादीत आहे.