मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी किल्ले शिवनेरीवर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर येतात. मात्र यंदा कोरोनामुळे राज्य सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी कलम 144 लागू केला आहे. त्यामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजंयती उत्सव साजरा केला जाणार आहे. याचदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना शाश्वत मानवंदना देण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे तरुणांना साद घातली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली- स्वराज्य! त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ देऊ या. शिवजयंतीला प्रत्येक गावानं ३९१ झाडे लावू या, ती जगवू या!
या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या! pic.twitter.com/RAEK0PSWOb— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 15, 2021
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीच्या निमित्ताने अमोल कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर 391 देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली- स्वराज्य. त्यांच्या जयंतीला मानवंदनाही शाश्वत देऊ या. याच संकल्पाची व्याप्ती वाढवत अमोल कोल्हे यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतींना 391 देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.