मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांच्या वर कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 875 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात 24 तासात 219 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजार 599 वर पोहचली आहे. राज्यात रुग्ण वाढीचा वेग वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 4634 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहे. राज्यात आतापर्यंत 123192 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55 टक्के आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 4.19 टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 18.86 टक्के इतकी आहे. राज्यात सध्या 91065 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Maharashtra’s COVID-19 tally rises to 2,30,599 with addition of 6,875 new cases; 219 deaths take toll to 9,667: Health dept
— Press Trust of India (@PTI_News) July 9, 2020
राज्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे तांडव सुरु असून आज दिवसभरात आणखी 219 जणांना या साथीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 9667 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एका राज्यातील हे सर्वाधिक कोरोनामृत्यू आहेत. आज दिवसभरात मुंबईत 68, ठाणे शहरात 20 तर कल्याण डोंबिवलीत 18 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.