नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI ने आमलात आणलेल्या नवीन नियमामुळे ATMद्वारे आणि ऑनलाईन ट्रांजेक्शन करणाऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपले ट्रांजेक्शन फेल्ड गेल्यास काही दिवसांतच त्या संबंधातील तक्रारिचा निकाल लागणार आहे. अनेकदा ट्रांजेक्शन करताना पैसे समोरच्याला न मिळता कट होतात, हेच टाळता यावे म्हणून RBI ने नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
जारी करण्यात आलेल्या टर्न राउंड टाइम (TAT) मध्ये स्पष्ट करत सांगितले कि, अश्या ट्रांजेक्शन फेल्ड गेलेले प्रकार ५ दिवसांत सोडवाव्या लागतील. तसेच फेल्ड ATM , स्वाईप मशीन , आधार एनेबल्ड पेमेंट ट्रांजेक्शनचे प्रकार ५ दिवसांत निकाली लावावे. आणि IMPS संबंधित फेल्ड ट्रांजेक्शन १ दिवसात निकाली लावावे.
२० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या सूचना पत्रात टर्न अराउंड टाइम संदर्भात दिशानिर्देश देण्यात आले आहेत. आता सर्व पेमेंट ऑपरेटरला हेल्ड ट्रांजेक्शन सांगितलेल्या काळात निकाली लावावे लागतील. तसेच आणि जर हे प्रकार लवकर निकाली नाही काढले तर बँकांला दंड भरावा लागेल. या संदर्भात माहिती RBI ने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.
जारी केलेले नवीन नियम :
१) खात्यातून पैसे कट झाल्यास लवकरात लवकर कारवाई करावी, त्याला ५ दिवसांपासून जास्त उशीर व्हायला नको. अन्यथा १०० रुपये दंड भरावा लागेल.
२)आपण जर ऑनलाईन ट्रांजेक्शन केले आणि समोरच्या व्यक्तीच्या खात्यात ते जमा झाले नाही तर, १ दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रतिदिन १०० रुपये भरावे लागतील.
३) खात्यातून पैसे कट झाले मात्र मर्चंडला कंफर्मेशन मिळाले नाही तर १०० रुपये दंड भराव लागेल, ही बाब ई- कॉमर्स साईटला देखील लागू होणार आहे.
४) तसेच युपीआय आणि IMPS संबंधित ट्रांजेक्शन देखील जे फेल्ड गेले आणि १ दिवस उशीर झाला तर प्रितिदिन १०० रुपये दंड भरावा लागेल. तसेच ट्रांजेक्शन झाले परंतु ते मर्चंडला त्याचे कन्फरमेशन मिळाले नाही, आणि ५ दिवस उशीर झाला तर १०० रुपये दंड भरावा लागेल. त्याचप्रमाणे आधार इनेबल्ड पेमेंड सर्व्हिससाठी देखील हे नियम लागू होणार आहेत.
Visit : bahujannama.com