हैदराबाद वृत्तसंस्था – भाजप सरकार तेलंगणामध्ये लवकरच सरकार स्थापन करू अशा वल्गना करत आहे परंतु सत्ता स्थापनेसाठी भाजप हिंदुत्वाचं कार्ड वापरू शकत नाही कारण के चंद्रशेखऱ राव सुद्धा कट्टर हिंदू आहेत. जर मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील अशा शब्दात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना ओवैसी म्हणाले कि,आम्ही हिंदू धर्माच्या विरोधात नसून हिंदुत्वाच्या विरोधात आहोत. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वींवरही निशाणा साधला आहे. नक्वींनी दरवर्षी एक कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं आश्वासन दिलं होतं. मग केंद्रीय अर्थसंकल्पात शिष्यवृत्ती काही दिली नाही ?, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
काही लोकांकडून ‘जय श्री राम’ आणि ‘वंदे मातरम’ न म्हटल्यास मुस्लिमांना मारहाण केली जाते. कारण ते जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा देत नाहीत. सध्या फक्त मुसलमान आणि दलितांना टार्गेट केलं जातंय. आता अशा घटना आता थांबणार नाहीत कारण या घटनांच्या मागे एक गट आहे आणि तो राष्ट्रीय सवयंसेवक संघ परिवाराशी निगडित आहे.राजस्थानमध्ये दोन वर्षांपूर्वी मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालेल्या पहलू खानविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. या प्रकरणावरून ओवैसी यांनी काँग्रेसलाही खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेस नेहमीच दुटप्पी भूमिका घेत असते. जेव्हा पहलू खानवर हल्ला झाला, त्यावेळी काँग्रेसनं त्याचा निषेध नोंदवला होता. अशोक गेहलोत सरकारचं हे निधेषार्ह कार्य आहे. राजस्थानच्या मुस्लिमांना काँग्रेसनं नेहमीच दगा दिला आहे. त्यामुळे यापुढे मुस्लिमांनी काँग्रेसवर विश्वास ठेवू नये आणि त्यांच्यापासून चार हात लांब राहावे.