बहुजननामा ऑनलाइन टीम – आज हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चार आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहे. आरोपींना घटनास्थळी नेले होते तिथे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आता यावर सर्वच स्तरावरुन निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. यावर योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. बलात्कारी आणि दहशतवादांवर अशीच कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर ज्या घटनांबाबत साशंकता असेल त्याबाबतच न्यायालयात जायला हवे, असे म्हणत त्यांनी शुक्रवारी घटनेचे समर्थन केले.
#WATCH Baba Ramdev: Jo is tarah ke apradhi hote hain,kalank hain,jinse desh,dharm,sanskriti badnaam hoti hai,unke saath aur jo aatankwadi hain unke saath, on the spot police aur sena ko aise hi karyavahi karni chahiye,jin ghatnaon mein sandeh hai unhe Court mein le jana chahiye.. pic.twitter.com/R6yAWBf5uZ
— ANI (@ANI) December 6, 2019
रामदेव बाबा म्हणाले की, ‘लोकांमुळे संपुर्ण देश आणि धर्म, संस्कृती बदनाम होत आहे. जे दुष्कृत्य करतात त्यांच्यासोबत आणि दहशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांनी, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी’
नेमकं काय झाल ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना ठार केले. अशी माहिती सायबरादाबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी सज्जनार यांनी दिली आहे.
काय आहे हे प्रकरण ?
तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे केले होते.
Visit : bahujannama.com