श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये १९७५ च्या आणीबाणीपैक्षाही वाईट स्थिती जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. काश्मीरमधील महत्वाच्या नत्यांना त्यांच्या घऱात कैद करत त्यांच्यावर प्रतिबंध लावले आहेत. भाजपाने असे करून आणीबाणीच्या इतिहासाची पुनर्रावृत्ती केली आहे. शेर-ए-काश्मीर भवन जम्मू मध्ये नॅशनल कॉन्फरन्सची बैठक पार पडली. त्यावेळी नेत्यांनी बैठकित म्हटले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य आहे असे दाखविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तर जम्मू काश्मीरमधील आणि लदाखमधील नेत्यांवर प्रतिबंध का लावण्यात आले आहेत. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष उमर अब्दूल्ला यांना सहा दिवस घरात कैद केले होते.
लोकशाही व्यवस्थेत असे का केले जात आहे. विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न केली जात आहे. बकरी ईदच्या निमित्ताने हे प्रतिबंध तात्काळ हटविले जावेत अशी मागणी त्यांनी केली.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्यात आली होती. तर जम्मू काश्मीरमधील इंटरनेट, टेलिविजन आणि संपर्काची माध्यमे बंद करण्यात आली होती. नॅशनल कॉन्फरन्सने कलम ३७० हटविल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.