बहुजननामा ऑनलाइन टीम – मानवाने जोडलेली पवित्र नाती कधी तोडू नका. कारण पाणी कितीही घाण
असले तरी ते तहान नाही, तर आग विझवू
शकते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ-उतार असतात, अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करण्याची उमेद बाळगली, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असा संदेश शिवसेना शिवअंगणवाडीच्या जिल्हा प्रमुख अमृत पठारे यांनी दिला.
वडगावशेरी (खराडी, थिटेनगर) येथे हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, मेहंदी स्पर्धा आणि हळदीकुंकू, तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शिवअंगणवाडीच्या जिल्हाप्रमुख अमृत पठारे यांनी केले होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सारिका सावंत-थडानी, उपअध्यक्षा रंजना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थित होती. याप्रसंगी सुदर्शना त्रिगुनाइत, पौर्णिमा कांबळे, सीमा सावंत, मीना काळे, कस्तुरी पाटील, पायल शिरसाठ, वैशाली दारवटकर, सविता बलकवडे, मीना बनकर, सुनंदा डेरे, अलका सोनवणे, अर्चना गौड, अंबिका ताटीकोंडा, कविता अंब्रे, स्मिता चव्हाण, शुभदा भगत,
सुक्रेताई शारदा मठपती, पुनम खंदारे, वर्षा ठाकरे, मीना शेजवळ,
सुनिता वाकचौरे
, पूनम ठाकूर आदी उपस्थित होते.