मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. जास्त जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन करणार जवळपास ठरलं आहे. त्यामुळे आगामी सरकारच्या नवीन मंत्रीमंडळाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या मंत्र्यांच्या नावांची चर्चादेखील सुरू झाली आहे.
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांची बैठक झाली असून सत्तास्थापनेत शिवसेनेत-
तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रुपाली चाकणकर यांनी जिल्ह्यात पक्षाचा आवाज बुलंद केला, त्यांनी अनेक आंदोलने देखील केली. राज्यात अनेक ठिकाणी पक्षाचा प्रचार केला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्या मंत्रीपदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. तसेच काँग्रेसमध्ये यशोमती ठाकूर यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा आहे. अनेक नेते पक्षाला सोडून गेले असताना देखील ठाकूर काँग्रेससोबत कायम उभ्या राहिल्या. दरम्यान शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची महिला आघाडी कायम भक्कम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचे नाव देखील मंत्रीपदासाठी चर्चेत आले आहे. त्या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.
Visit : bahujannama.com