जयपुर : वृत्तसंस्था – जयपुरमधील एका महिलेला सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेयर करण्यासह फॉलोअर्सची संख्या वाढत असल्याच्या कारणावरून आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. पत्नीचे फेसबुकवर 6000 पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले होते आणि ती सतत मोबाईलवर व्यस्त रहू लागली होती. पत्नीच्या या सवयीमुळे त्रस्त झालेल्या पतीने षडयंत्र रचून पत्नीची हत्या केली. ही घटना जयपुरच्या आमेरमधील आहे, जेथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी हा मोठा खुलासा केला. पोलिसांनी हत्येप्रकरणी महिलेचा पती अयाज अहमदला अटक केली आहे.
प्रकरणाची माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त क्राईम अशोक कुमार गुप्ता यांनी सांगितले की, दिल्ली हाय-वेवरील माता मंदीराजवळ रस्त्याच्या कडेला एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह मिळाला होता. जवळच महिलेची स्कुटी आणि हेल्मेटसुद्धा सापडले होते, ज्याद्वारे तिची ओळख पटली.
ओळख लपविण्यासाठी दगडाने ठेचले डोके
पोलिसांच्या माहितीनुसार हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून दगडाने तिचे डोके ठेचण्यात आले होते. या मृतदेहाची ओळख पटली असून तिचे नाव नैना उर्फ रेश्मा मंगलानी असल्याचे समजले. पोलिसांनी कुटुंबियांकडे चौकशी केली असता त्यांनी पतीवर संशय व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वीच दोघांनी गाझियाबादमध्ये येऊन आर्य समाजमध्ये लग्न केले होते. नंतर पतीच्या सांगण्यावरून रेश्माने निकाह सुद्धा केला होता. दोघांना 3 महिन्यांची मुलगीसुद्धा आहे.
पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे ओरापी अयाज अहमद आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू होता. रेश्मा मागील 1 वर्षापासून आपल्या पतीपासून वेगळी रहात होती. पती समेट घडवून आणण्याच्या बहाण्याने तिला घेऊन गेला. प्रथम दोघे दारू प्यायले आणि नंतर त्याने डोके ठेचून तिची हत्या केली. रेश्मा सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेयर करायची. तिचे फॉलोअर्ससुद्धा खुप वाढले होते. यामुळे आरोपी पती तिच्यावर संशय घेत होता, ज्यामुळे त्याने हे निर्घृण कृत्य केले.
Visit : bahujannama.com