मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. बहुमत मिळूनही भाजप – शिवसेना एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टीका करत अद्यापही सरकार स्थापन करण्याचा दावा का नाही करत ? असा सवाल केला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस उलगडले असून आद्यपही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळत बहुमत मिळाला होत, परंतु सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षांत वाद सुरु आहेत. शिवसेना ५०-५० फॉर्मुल्याची मागणी मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे, तर भाजपला शिवसेनेची हि मागणी मान्य नसल्याने दोन्ही पक्षांतील हा तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीये.
शिवसेनेने आमच्या सामना या मुखपत्रातून भाजपवर टीकेची झोड उठवली होती. पक्षाने म्हंटले कि, ‘गोवा आणि मणिपूर मध्ये भाजपचे बहुमत नव्हते तरी देखील त्यांनी सरकार स्थापन केले. तसेच राज्यपालांच्या पाठिंब्याशिवाय हि गोष्ट घडलेली नाही, हि गोष्ट देखील लपून राहिलेली नाही. परंतु महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळवून देखील भाजपा सरकार स्थापन करण्याचा दावा का करत नाही ?’ असा सवाल करत शिवसेनेने पुन्हा एकदा सत्तेचा दावा केला आहे.
तसेच शिवसेनेने पुढे म्हंटले कि, जे ठरले होते त्याचे काय जागावाटपाच्या वेळी मिळून सत्ता स्थापन करू असा दावा भाजपने केला होता, मात्र आता त्या दाव्याचे काय झाले असा सवालही शिवसेनेने केला आहे. परंतु हा दावा भाजप फेटाळून लावत आहे, असे कोणतेही आश्वासन आम्ही दिले नव्हते , असे भाजपकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टीका करत असे खोटारडे राजकारणात आम्ही सहभाग घेणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील मागील विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भाजपला सार्वधिक जागा मिळाल्याने राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार असल्याची शक्यता आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला.
Visit : bahujannama.com