नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाइन – तृतीयपंथीना काही लोकांनी मतभेद करून सुद्धा वाळीत फेकले त्यांच्यावर विविध अत्याचार होतात पण ते कुठं सांगून घेत नाही पण जे मर्जी बाहेर झाले ते मात्र सांगून घेणे उचित असते असेच एक प्रकरण नांदेड शहरात शिवाजी नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत झाले. दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला अटक का करत नाहीत म्हणून, पिडीत तृतीयपंथीयांसह दोघींनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता गोंधळ घातला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
शहराच्या एका भागात राहणाऱ्या एका तृतीयपंथीयासोबत नवीआबादी येथील एका युवकाने अनैसर्गिक अत्याचार व फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी आपल्या पथकाला पीडित तृतीयपंथीयाला सोबत घेऊन हैदराबादला पाठविले. या पथकाने पूर्ण हैदराबाद पालथे घातले मात्र आरोपीचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळी हे पथक रिकाम्या हाती परतले.सायंकाळी पीडीत तृतीयपंथीयाने नशा करून सोबत दुसरा तृतीयपंथी आणून पोलिस ठाण्यात प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांसोबत हुज्जत घालून अंगावर स्वत: मारून घेऊन जखमी करून घेतले. हा प्रकार तब्बल एक तास सुरू होता. पोलिसांनी संयम राखून त्यांना ताब्यात घेऊन स्थानबध्द केले. नशेत असलेल्या तृतीयपंथीयांनी आपण काय करत आहोत याचे थोडेही भान ठेवले नव्हते. या गोंधळानंतर पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के यांनीही भेट दिली.ते यावर काय कार्यवाही करतात ह्या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.