बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे ब्रँडवरून केलेल्या वक्तव्यानंतर मनसे पेटून उठली आहे. ठाकरे ब्रँड सांभाळण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली होती. यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा यावर भाष्य करत टीका केली आहे. इतकंच नाही तर देशपांडे यांच्यानंतर अमेय खोपकर यांनीही ट्विट करत नाव न घेता शिवसेना, खासदार संजय राऊत आणि सीएम उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, “विचार, संयम, स्वाभिमान यामुळं ब्रँड मजबूत होत असतो. याउलट तडजोड, लाचारी यामुळं व्यवसाय तर होतो परंतु ब्रँड रसातळाला जातो” अशी टीका करत संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि सीएम ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
विचार,संयम' स्वाभिमान या मुळे "ब्रॅण्ड"मजबूत होत असतो. या उलट तडजोड,लाचारी यामुळे व्यवसाय तर होतो पण ब्रॅण्ड रसातळाला जातो
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 14, 2020
यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही यावरून जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, “कोणी घरी बसतो, कोणी उरी बसतो, कोणाचा बँड वाजतो तर कोणाचा ब्रँड गाजतो असं ट्विट खोपकर यांनी केलं आहे.
कोणी घरी बसतो
कोणी उरी बसतो
कोणाचा बॅंड वाजतो
कोणाचा ब्रॅंड गाजतो!— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 13, 2020
संजय राऊतांच्या ब्रँडबद्दलच्या वक्तव्यानंतर आता मनसैनिक पेटून उठले आहेत. रविवारी या प्रकरणी अनेक मनसे नेत्यांनी उडी घेत शिवसेना आणि राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांनी खरं तर सामनातून ठाकरे ब्रँडचा विषय काढत राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला परंतु मनसेकडून मात्र सेनेवर टीकात्म प्रतिक्रिया दिली जात आहे.
ठाकरे हा ब्रँड कोण जपतय हे साऱ्या जगाला माहीत आहे…..!!!! pic.twitter.com/ZUbOn7Gvf6
— Shalini Thackeray (@ThakareShalini) September 13, 2020