नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १७ शतकात जसे रायगड राजधानी होती. तशीच ती पुर्ववत करावी. शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा देण्यात यावा. किल्ले रायगडाची उभारणी पुन्हा नव्याने करावी. स्टॅच्यू ऑफ युनीटीप्रमाणे ती जपायला हवी. तसे केल्यास ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल. अशी मागणी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत आज केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर लोकसभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं म्हणणं आज मांडलं. किल्ले रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. जर स्टेच्यू ऑफ युनीटीचा विचार होत असेल. तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचाही विचार व्हायला हवा. छत्रपती शिवरायांच्या राजधानीची शासनाने जपणूक केल्यास ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल. असे ते यावेळी म्हणाले.
डॉ. अमोल कोल्हे हे सुरुवातीपासूनच गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत. ते सध्या छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तीरेखा साकारत आहेत. त्यांना लोकसभा निवडणूकीत त्यांनी शिवसेनेचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला होता. शिरूर मतदारसंघातून ते निवडून आले.