नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तंत्रज्ञानाचा वापर जेवढा वाढत आहे, तेवढाच तो नात्यांमध्ये बाधा निर्माण करत आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि अन्य सोशल साईट्स आणि त्यांना लॉक करण्याच्या पासवर्ड तसेच फिंगर इम्प्रेशनने संपूर्ण मोबाईल लॉक करणाच्या सिस्टम बाबत बोलायचे तर, या गोष्टी शेयर न करण्यावरून पती-पत्नीच्या मनात संशय निर्माण होत आहे. हा संशय हळूहळू स्वभावाचा भागच होऊन जातो. आज याच कारणावरून अनेक पती-पत्नी घटस्फोटाच्या वळणावर आले आहेत. या संशयाच्या भोवर्यात शहरी भागातील उच्चशिक्षित पती-पत्नीसुद्धा सापडत आहेत. जेव्हा दोघेही नोकरी करणारे असतात तेव्हा शंका आणखी वाढते. महिला हेल्पलाईनमध्ये अशा प्रकारांचे प्रमाण खुप वाढले आहे.
चॅट आणि कॉल डिलीट करणे वादाचे कारण
हेल्पलाईनमध्ये काही प्रकरणात समुपदेशन सुरू आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअप चॅट डिलीट करण्यावरून भांडणे होतात. चॅट डिलीट केल्याने दुसर्या बाजूकडील राग आणि संशय वाढतो. अशा स्थितीत त्यांचे समुपदेशन केले जाते आणि सल्ला दिला जातो की, नात्यांमध्ये जेवढी पारदर्शकता असेल तेवढे चांगले असते. यात काही महिला आणि पुरूषांचे म्हणणे आहे की, त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे. त्यांना पासवर्ड शेअर करायचा नाही, परंतु नात्याचा विचार करता ही गोष्ट ते नंतर समजून घेतात.
छोटे-छोटे वाद होतात गंभीर
पती-पत्नीमधील हे छोटे-छोटे वाद नंतर खुपच गंभीर रूप घेत असल्याचे दिसत आहे. असे नव्हे की केवळ पुरूषांचीच चुकी असते, महिलासुद्धा अनेकदा चुकीच्या वागत असतात. दोघांपैकी एकजण तेव्हा काही गोष्टी लपवतो, जेव्हा काही तरी चुकीचे असते. संशयाची शक्यता तेव्हा वाढते, जेव्हा ऑफिसमधील कलिगचे कारण सांगितले जाते. यासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल नात्यामध्ये अंतर ठेवण्याची गरज आहे.
– प्रमिला कुमारी, प्रोजेक्ट मॅनेजर, महिला हेल्पलाईन
नात्यांमध्ये फुट पाडत आहे सोशल मीडिया
सध्या व्हॉट्सअप केवळ युवकांना बरबाद करत नसून प्रौढांच्या नात्यातही फुट पाडत आहे. अशा स्थितीत विश्वास आणि पारदर्शकता जरूरी आहे. जेवढे शक्य होईल तेवढा वेळ ऐकमेकांसोबत घालवा. अनावश्यक विचार न करता खुलेपणाने बोला. तेव्हाच समस्या सुटू शकतील
– सरिता सजल, काऊन्सिलर, महिला हेल्पलाईन
आपसातील सामंजस्याची कमतरता
नाते तुटण्याच्या प्रमाणात 2005 नंतर खुप वाढ झाली आहे. आज मुली इंडिपेन्डेंट, वर्किंग असण्यासोबतच शिक्षित आहेत. उशीरा विवाह करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे दोघांच्या विचारात खुपच अंतर असते. नात्यांमध्ये फुट पाडण्याचे काम आता मोबाइल फोन सुद्धा करत आहे, ज्यामध्ये पासवर्ड लॉक करणे हे मोठे कारण असते.
– रणधीर कुमार सिंह, समाज तज्ज्ञ
केस 1
बोरींग रोडवर राहणार्या रमा (बदललेले नाव) चा आपल्या पतीवर संशय होता की त्याचे कुणाशी तरी अफेयर सुरू आहे. तिने अनेकवेळा पतीला फोन आणि व्हॉट्सअप पासवर्ड विचारला, पण त्यांने सांगितला नाही. यानंतर तिने स्व:ताचा फोन आणि सोशल मीडिया पासवर्डने सुरक्षित केला. पतीला जसे याबाबत समजले त्याने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली, आणि फोन अनलॉक करण्यास सांगितले. ज्यानंतर रमाने महिला हेल्पलाईनमध्ये तक्रार केली.
केस 2
अनिसाबाद येथे राहणार्या अनिता (बदललेले नाव) ने हेल्पलाईनमध्ये तक्रार करून सांगितले की, पतीजवळ दोन फोन आहेत, परंतु, ते एकही फोन वापरत नव्हते. लग्नाला वीस वर्षे झाली आहेत, परंतु मागच्या वर्षापासून त्यांनी फोनमध्ये फिंगर लॉक करण्यास सुरूवात केली आहे. विचारल्यावर भांडतात, कधी-कधी हात उचलतात. आता दोघांचे समुपदेशन सुरू आहे.