नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेत आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. १.६ दशलक्ष लोक मतदानात भाग घेत आहेत. या निवडणुकीकडे बर्याच देशांचे लक्ष लागून आहे. अलीकडेच चीन आणि श्रीलंका यांच्या वाढत्या सान्निध्यामुळे भारतही या निवडणुकीत बराच रस घेत आहे. श्रीलंकेबरोबर भारताचे नेहमीच चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत कोणाचा विजय भारतासाठी फायदेशीर ठरेल असा प्रश्न पडतो.
कोण आहेत उमेदवार ?
या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ५२ वर्षीय उमेदवार आणि गृहनिर्माण मंत्री साजित प्रेमदासा आणि माजी संरक्षण सचिव आणि विरोधी पक्षनेते गौतबाया राजपक्षे यांच्यात जोरदार झुंज सुरू आहे. अनुरा कुमारा दिसानायके हे नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे प्रबळ उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार मोठ्या राजकीय घरातील आहेत. प्रेमदास हे माजी राष्ट्रपती रणसिंगे प्रेमदासा यांचे पुत्र आहेत. १९९३ मध्ये त्यांची हत्या LITE केली होती. गौतबाया राजपक्षे हे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. महिंदानेच उत्तरेकडील एलटीटीई विरुद्ध शेवटची लढाई केली होती.
भारतासोबतचे संबंध
या दोघांसोबत भारताला चांगले संबंध होण्याची आशा आहे. 1987 – 90 पर्यंत भारतीय शांती सेनेसाठी श्रीलंकेमध्ये गुप्त पद्दतीने काम केलेले रिटायर्ड कर्नल आर हरिहरन यांचे म्हणने आहे की, भारताला दोनीही उमेदवारांपैकी कोणाचीही काळजी करण्याची गरज नाही. ते म्हणाले, ‘इलाम युद्धाच्या वेळी गौतबाया राजपक्षे संरक्षण सचिव होते. त्याचवेळी त्याचा भाऊ तेथील राष्ट्रपती होता. त्या दिवसांमध्ये, तामिळनाडूमध्ये श्रीलंकेविरूद्ध आवाज उठला होता. असे असूनही, नवी दिल्लीने हा विषय फार मोठा होऊ दिला नाही. राजपक्षे यांच्यावरही त्या काळात मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप होता, परंतु भारताच्या पाठिंब्यामुळे संयुक्त राष्ट्राची वृत्ती नरम झाल्याचे दिसून आले होते.
राजपक्षे यांचे चीन प्रेम
राजपक्षे यांच्या निवडणुक प्रचारात राष्ट्रीय सुरक्षेचा विषय हा प्रमुख मुद्दा होता, त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हंटले होते की, सुरक्षा संबंधांबाबत त्यांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. परंतु भारताला या गोष्टीची देखील चिंता आहे की राजपक्षे यांना चीनसोबत सुद्धा चांगले संबंध ठेवायचे आहेत. चीनने त्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय फंडिंग केल्याची चर्चा देखील आहे. सजित प्रेमदासा यांच्यासोबत भारताचे संबंध चांगले होऊ शकतात, तामिळ नॅशनल एलायन्स पार्टीने या आधीच सजित प्रेमदासा यांना समर्थन दिलेले आहे. रिटायर कर्नल हरिहरन म्हणतात, ज्यावेळी पंतप्रधान मोदी श्रीलंका दौऱ्यावर गेले होते त्यावेळी सजित प्रेमदासा हे मोदींसोबत होते. त्यावेळी या दोनीही नेत्यांमध्ये मोठी सकारात्मकता दिसत होती. सजित हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना भारतासोबतच्या चांगल्या वाईट अशा सर्व संबंधांबाबत माहिती आहे.
Visit : bahujannama.com