बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याबाबत बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, खासदार छत्रपती संभाजी राजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे? असा सवाल करत पाटील यांनी राज्यातील ठाकरे सरकार हे कोडग सरकार असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. तसेच संभाजीराजेंवर हेरगिरी सुरू असून मी त्याचा निषेध करतो असेही पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि.1) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या निर्णयात केंद्राचा काय संबध, राज्य सरकारने दीड वर्षांपासून मागासवर्गीय आयोग नेमला नाही, त्यांनी तो आधी नेमावा असा टोला देखील पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी मुलीचा लग्नाचा कार्यक्रमात गर्दी जमवल्याबाबत बोलताना पाटील म्हणाले. आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढली, गर्दी जमवली हे चुकीचे आहे. महेश लांडगे यांना समज देण्यात येईल, असे ते म्हणाले.
खरंच भारत सरकार 3 महिन्यांसाठी 10 कोटी युजर्संना फ्री इंटरनेट देणार? जाणून घ्या ‘सत्य’
दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 858 रूग्ण ‘कोरोना’मुक्त
पोलिसांशी धक्काबुक्की करणाऱ्या पती-पत्नीला पोलीस कोठडी
कोरोना संसर्गात मृत्यूचा धोका कमी करते ‘ही’ एक गोष्ट, NIMS स्टडीमध्ये दावा
कोरोनाने पुन्हा चीनचे दार ठोठावले; 23 नवे रुग्ण, अनेक शहरांमध्ये निर्बंध लागू