नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालचे वातावरण चांगलेच तापले आहे. आठ टप्प्यांत घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनीच पक्षाचे कार्यालय आणि नेत्यांवर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच उत्तर २४ परगनाच्या जगदलमध्ये भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांचे निवासस्थान बाहेर बुधवारी रात्री क्रूड बॉम्बद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात लहान मुलासह ३ जण जखमी झाले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाकडे या हल्ल्याची तक्रार करणार असल्याचे भाजपने म्हंटले आहे.
We will approach the Election Commission regarding the incident (which took place in Jagaddal, North 24 Parganas): West Bengal BJP leader Mukul Roy in Delhi https://t.co/N4Eubyzx85 pic.twitter.com/miH6pRw3X6
— ANI (@ANI) March 17, 2021
बैरकपूरचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घरापासून जवळच १८ नंबरच्या गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. केवळ एका ठिकाणी नाही तर परिसरातील १५ ठिकाणी बॉम्ब फेकण्यात आले. परिसरात पोलिसांनी लावलेले सीसीटीव्ही देखील हल्लेखोरांनी तोडले आहेत. या हल्ल्याची तसेच जखमींची माहिती एसीपी ए पी चौधरी यांनी एएनआय़ला दिली आहे.
या बॉम्ब हल्ल्यासंदर्भात बोलताना भाजप नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले की, हिंसाचाराची राजनिती म्हणजे टीएमसी आहे. बंगालमध्ये आचार संहिता लागू होताच बॉम्बफेक, गोळ्या झाडल्या जात आहेत. या घटना निवडणूक आयोगाने हे इशारा म्हणून घ्यावे, अन्यथा मतदान शांततेत होण्याची शक्यता नसल्याचे म्हंटले आहे.
पोलिसांवर खासदार संतापले
हल्लेखोरांनी १७ नंबरची गल्ली समजून १८ नंबरच्या गल्लीमध्ये बॉम्ब फेकले. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान या हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यावेळी पोलिसांनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांसमोरच एक बॉम्ब पडल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती समजताच प्रचार सोडून भाजपाचे खासदार अर्जुन सिंह घरी आले. त्यांनी पोलिसांना खडेबोल सुनावले. तसेच तुमच्याने काही होत नसेल तर इथून निघून जावे, असेही त्यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांच्या आदेशावर पोलिस काम करत आहेत. बारा दिवसापासून सांगूनही पोलिसांनी काहीच केले नाही. आम्ही निवडणूक आयोगालाही सांगितले आहे. आता पुन्हा बॉम्बफेक झाली आहे. पोलीस काहीच करत नसल्याचे खासदारांनी आरोप केला आहे.