कोलकाता वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगाल मध्ये यंदा चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यांना तब्बल १४ जागा मिळाल्या आहेत आता ममता बॅनर्जी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ” जय श्री रामच्या घोषणा देणाऱ्यांची चामडी सोलून काढू,” तसेच या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि ,ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी २४ परगाणा जिल्ह्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या जात असताना एका जमावाने ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या. या घोषणा ऐकून संतापलेल्या ममता यांनी त्यांची गाडी थांबविली व त्या गाडी बाहेर येऊन त्या लोकांना आव्हान दिलं. ‘तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्या समोर या. कारण तुह्मी बंगालचे नागरिक वाटत नाही भाजपचे गुंड, बदमाश लोकं आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि तुह्मी आमच्यामुळे इथे राहत आहात . तुमच्या सारख्या लोकांना मी इथून पळवून लाऊ शकते.तुमची हिम्मत कशी झाली असे करण्याची. एकेकाची चामडी सोलून काढेन’, असा इशारा त्यांनी दिला. तसेच हे सर्व जण बाहेरचे लोकं आहेत या उपद्रवी लोकांना तत्काळ अटक करा’, असे आदेश तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी दिला.
याआधीही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यासमोर काही जणांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांच्यावर संताप व्यक्त केले होता.