नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशभरात सीएए विरोधात निदर्शने चालू असून पश्चिम बंगालमध्येही निदर्शने होत आहेत. पश्चिम बंगालमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि संगीतकार क्षेत्रातील कलाकारांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावरून लोकसभा सीटचे खासदार सौमित्र खान यांनी एक विधान केले आहे.
#WATCH West Bengal BJP Chief Dilip Ghosh in North 24 Parganas: Under Mamata Banerjee's government, even if one damages public property worth Rs 500 crores, that person escapes it. When we come to power then every such person will be identified and shot at. Nobody will be spared. pic.twitter.com/ihU9LqtQcZ
— ANI (@ANI) January 19, 2020
ज्यांनी या आंदोलनात भाग घेतला आहे, त्यांना एनआरसी आणि सीएएशी संबंधित तथ्य माहित आहे. पण तरीपण जे असे करत आहेत, ती लोकं ममता बॅनर्जी यांची कुत्री आहेत. आज ही लोकं सीएएला विरोध करत आहेत. पण पार्क स्ट्रीटमधील कामदुनी आणि सामूहिक बलात्कारावर गप्प का होते, ते सांगा, असे वादग्रस्त विधान सौमित्र खान यांनी केले आहे. सौमित्र खान यांनी अलीकडेच तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
याअगोदर पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनीही असेच वादग्रस्त विधान केले होते. देशभरात प्रस्तावित राष्ट्रीय नागरी रजिस्टरची अंमलबजावणी करण्यास सरकार वचनबद्ध आहे आणि राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशातील ५० लाख बांगलादेशी मुस्लिमांना परत पाठवणार आहे, असे ते रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले होते. तसेच सत्तेत आल्यास सार्वजनिक मालमत्तेची हानी करणाऱ्यांना मी गोळीबार करेन, असेही ते म्हणाले होते.
Visit : bahujannama.com