मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महिन्याभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर काही दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारलेली होती, परंतु राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे ही निर्माण झाली आहे. येत्या आठवड्यात राज्याच्या सर्वच भागात पासून पडण्याची शक्यता आहे. त्यातही मुंबई, ठाणे कोकण विभाग तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १८ ते २० सप्टेंबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितूनुसार भिवंडीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तिनबत्ती बाजारपेठेतील तब्बल दीडशेपेक्षा जास्त दुकानात पाणी शिरलं आहे, त्यामुळे संपूर्ण व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा आहे की वाहनंदेखील पाण्याबरोबर वाहून जात आहेत. पावसाच्या भीतीने सामान्य नागरिक आणि व्यापारी रात्रभर जागे आहेत. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. मात्र, महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपासून मुंबईमध्ये जरी हजेरी लावलेली नसली तरी इतर भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरात एकसारखा पाऊस सुरु आहे. यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्यातील काही भागाला पाणी पुरवठा करणारे गिरणा डॅम ९४ टक्के भरलं आहे. २००७ नंतर पहिल्यांदाच धरणात १०० टक्के भरलं असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान राज्यातील काही भागांत मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. लातूरकडे पावसाचा पत्याचं नाहीये. त्यामुळे अनेक संकटांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ममदापूरमध्ये शिवारात विहरीतून पाणी टँकरमध्ये भरत असताना टँकर विहिरीत पडून ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तसेच पालघरमधेही डहाणू आशागड इथे असलेल्या आंबेसरीमधील पुल पावसामुळे पडला. त्यामुळे वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे.
त्याचप्रमाणे पाऊस पडावा यासाठी नवस केले जात आहेत, विविध पद्धतीचे विवाह केले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातही पावसानं दांडी मारलेली आहे. पावसाचे आगमन व्हावे यासाठी अचकदाणी इथल्या ग्रामस्थांनी जलराज आणि जलपरी या नर मादी माश्यांचा विवाह लावत वरूण राजाला आवाहन केलं आहे. विवाह मंडपात दोन काचेच्या पेटीत ठेवलेला नर मासा हा जलराज बनला होता. तर मादी मासा जलपरी झाली होती. सर्वांच्या साक्षीने असा हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात येत्या २ दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.