मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा(Rain) अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस(Rain) कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या पाच दिवसांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Nowcast warning at 1500 Hrs Thunderstorm with lightning and mod to intense spells of rain, gusty winds 30-40kmph likely to occur at isol places in districts of Sangli,Pune,Beed,Solapur nxt 3 hrs. Tk precautions while moving out. Don't stand nearby large trees.@RMC_Mumbai
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 29, 2021
पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल. सांगली, सोलापूर, पुणे, बीडमध्ये येत्या तीन तासात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या, उंच झाडाखाली उभं राहू नका, असं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केले आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वसमत, औंढा, कळमनुरी या तालुक्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1398564939585888256
भारतात पावसाळा ऋतुसाठी कारणीभूत असलेल्या नैऋत्य मोसमी वारे केरळपासून अवघ्या काही किमी अंतरावर आले आहेत. कोणत्याही क्षणी केरळात मान्सूनचं आगमन होऊ शकतं. यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा अगोदर केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दुरीकडे राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याआधीच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
Significant Weather Features dated 29-05-2021 are:
♦ The northern limit of Southwest Monsoon continues to pass through 5°N/72°E, 6°N/75°E, 8°N/80°E, 12°N/85°E, 14°N/90°E and 17°N/94°E.— India Meteorological Department (@Indiametdept) May 29, 2021