सांगली : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने रद्द केलेल्या इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षांचे (HSC exam) निकाल येत्या काही दिवसात लागतील. त्या अनुषंगाने प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रवेशाचा (first year admission) तातडीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.
इस्लामपूर तहसिलदार कार्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासंदर्भात (first year admission) आयोजित ऑनलाईन बैठकीत मंत्री उदय सामंत (Uday Samant) बोलत होते.
इयत्ता 12 वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचा असतो.
यासाठी सीईटी परीक्षा महत्वाची असते.
या सीईटीच्या परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाची तयारी सुरु आहे.
तसेच 12 वीच्या निकालानंतर तातडीने प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
असे सामंत म्हणाले.
तंत्रशिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रिया साधारण जुलै, ऑगस्टपर्यंत चालते.
12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच गुणांची टक्केवारी कळेल.
त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे धोरण राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरणार असल्याचे सामंत म्हणाले.
यावेळी बैठकीला वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसिलदार रविंद्र सबनिस, यतीन पारगावकर तसेच दूरदृश्य प्रणालीव्दारे विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक उपस्थित होते.
कृपया हे देखील वाचा:
शिवसेनेची भाजपवर टीका, म्हणाले – ‘अजितदादा पत्र चोरत असताना ‘टॉर्च’चा ‘लाईट’ मारण्यासाठी भाजपचे कोण लोक होते?
मेट्रोमोनियल वेबसाईटवरून त्यानं तब्बल 15 युवतींना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढलं, अन्…
दारु पिण्याच्या कारणावरुन तरुणाचा खुन करुन मृतदेह टाकला इंद्रायणी नदीत
खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा
प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन