नवी दिल्ली (बहुजननामा) – राम मंदिर प्रकरणी आणि बाबरी वादावर सर्वौच्च न्यायालयाने महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 2 ऑगस्टपासून या प्रकरणी दररोज सुनावणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यासाठी न्यायालयाने मध्यस्थ समितीला 31 जुलै पर्यंत आपला अहवाल देण्यास सांगितला आहे. हा अहवाल दिल्यानंतर २ ऑगस्टपासून दररोज सुनावणीला सुरुवात होईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राममंदिर व बाबरी वादावर मध्यस्थी समितीनी स्थापना केली होती. या समितीने 18 जुलैला आपला प्रगती अहवाल न्या. रंजन गोगई यांना सादर केला. काही दिवसांपूर्वी एक पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी मध्यस्थ समितीमार्फत याप्रकरणावर अंतिम तोडगा निघणे कठिण दिसत असल्याचे म्हटले होते. मध्यस्थ समिती केवळ वेळ काढूपणा करत असून याप्रकरणी न्यायालयाने स्वत: रोज सुनावणी करावी, अशी मागणी केली होती. त्यावर आज 31 जुलै पर्यंत मध्यस्थ समितीने आपला पुर्ण अहवाल द्यावा त्यानंतर 2 ऑगस्ट यावर सुनावणी करेल असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे.
मध्यस्थ समितीने रामजन्म भुमी व बाबरी वादावर काय तोडगा आपल्या अहवालात सांगितला आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या तोडग्यावर सर्वोच्च न्यायालयाची भुमिका काय असेल याविषयी देखील चर्चे केली जाते आहे. त्यामुळे 2 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या सुनावणीकडे संपुर्ण देशाचे लक्ष असणार आहे.