मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- आज झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचा कौल मान्य केला. पंकजा मुंडेंच्या आणि उदयनराजेंच्या पराभवाचे विश्लेषण आम्ही करू. १६४ जागांवर भाजप लढत होती मात्र लोकसभेच्या टक्क्यावरीवरून या वेळी खूप कमी टक्केवारी आले आहे. तरीही १६४ जागा लढवून आमच्या मतांची टक्केवारी यावेळेस २६ आली आहे. हि विजय साजरा करण्याची वेळ विश्लेषणाची नाही, विश्लेषण करू आम्ही. उदयनराजे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा खूप मोठा धक्का बसला आहे.
निवडणुकीत जनेतच सर्वात मोठं समर्थन भाजपला मिळालं मंत्र्यांच्या पराभवाचे देखील समर्थन करु. अपक्ष आणि इतरमधील १४ जण महायुतीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव यांचं म्हणणं नीट ऐकलं जे ठरलाय त्याप्रमाणे पुढे जाऊ. योग्य वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. ते म्हणाले की, आम्हाला बंडखोरीमुळे फटका बसला आहे. सत्ता आम्हीच स्थापन करणार यात शंका नाही. शरद पवार यांना टोला लगावत ते म्हणाले की, शरद पवारांनी आनंदित होण्याची काही गरज नाही. आम्ही देवाण घेवाण करत नाही आमची हिंदुत्वावर युती आहे.
Visit : bahujannama.com