बहुजननामा ऑनलाइन टीम : नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत काल राष्ट्रवादी नेते शरद पवार यांची खडसेंची भेट घेतल्यानंतर आज ते मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहे. दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या खडसेंनी भाजप नेत्यांची भेट न घेता परतवारी केली. दरम्यान खडसेंना आता कॉंग्रसने ऑफर दिली आहे. राज्यातील भाजपा नेतृत्वाखाली खडसेंनी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीगाठी महत्वापुर्ण मानल्या जात आहे.
‘नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, त्यांची अवहेलना झालेली आम्हाला देखील आवडली नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्हीदेखील काही प्रस्ताव दिला नाही. पण, अशी माणसं पक्षात आली तर आनंदच होईल, पक्षाला बळकटी मिळेल, असे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच, भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी, असा थोरात यांनी टोला लगावला.
विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्याने आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांची पक्षासंबंधित नाराजी उघडपणे बोलून दाखविली. दिल्लीत गेलेल्या एकाही नेत्यांची खडसे यांनी भेट घेतली नाही. अमित शाह लोकसभेत होते सतेच जे पी नड्डा, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची देखील खडसेंनी भेट घेतली नाही. त्यामुळे खडसे वेगळी वाट धरणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नावर पवारांची भेट घेतल्याचे खडसेंनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंनी वारंवार पक्षावर टीका केली आहे. वेगळा विचार करू, असा निर्वाणीचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे खडसे-ठाकरे भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यात, बाळासाहेब थोरातांनी सूचक विधान करत खडसेंना बळ दिलं आहे.
Visit : bahujannama.com