ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – जून महिना संपत आला तरी पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. दिवसेंदिवस ती अणखी गंभीर बनत चालली आहे. त्यातच ठाण्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लगेच सोडवा अन्यथा ठाणे शहर बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
आव्हाड म्हणाले की, महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करु नये. त्यांनी शहरात पाणीबाणी लागू करावी. वीस वर्षांपासून धरण बांधण्याची मागणी होत असताना, धरण का बांधले जात नाही. असा सवाल ही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
मी एकटाच पाण्यासाठी आवाज उठवत आहे. पक्ष कोणतेही असो आमदारांनी पाण्याच्या प्रश्नासाठी पुढाकर घ्यायला हवे असे आव्हाड म्हणाले. पाणी प्रश्नावर लोकप्रतिनिधी शांत का बसले आहेत, जनता आता असा प्रश्न विचारू लागली आहेत. शहरातील सगळ्यात उच्चभ्रू वस्ती म्हणून घोडबंदरला समजले जाते. मात्र त्याच घोडबंदरला ३६५ दिवस पाणी मिळत नाही. एवढच नाही तर संपूर्ण ठाणे शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घोडबंदरमधून आवाज उठला आहे. आता तो संपूर्ण ठाण्यात घुमणार आहे.
पाणी प्रश्नाला सेना भाजप जबाबदार
ठाणे शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. संपुर्ण शहरातच पाणी टंचाई सुरु आहे. शहरात कुठेच पाणी नाही ठाण्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीला फक्त सेना-भाजप जवाबदार असल्याचा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.