बहुजननामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे अशी टीका काँग्रेसचे नेते अभिषेक सिंघवी यांनी केली आहे. मोदींनी निवडणुकांआधी जनतेला स्वतंत्र आणि अडथळमुक्त अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. पण आता मोदी या आश्वासनांचा भंग करत आहेत. अशी टीका अभिषेक सिंघवी यांनी केली आहे. सीसीडीचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडल्यानंतर काही वेळातच सिंघवी यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या एका पात्रात प्राप्तीकर विभागाने आपला छळ मांडल्याचे म्हंटले होते. मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासून ढासळती अर्थव्यवस्था व कायदा – सुव्यवस्थेची स्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा देशासमोरील ज्वलंत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न चालू आहेत अशी टीकाही सिंघवी यांनी केली आहे. या अशा गोष्टींवरून लोकांचे लक्ष वाळवण्यासाठी मोदी काश्मीर, पाकिस्तान, मुस्लीम महिला, राम , बहुसंख्याकवाद, अल्पसंख्याकवाद या गोष्टींचा ही आधार घेत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यामंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की सीसीडीचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू ही एक दुर्दैवी घटना आहे. विविध तपासयंत्रणांकडून होत असलेल्या छळाने ते निराश झाले होते, असा आरोपही ममता यांनी केला आहे. तसेच सिद्धार्थ याच्या मृत्यूबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही तीव्र शोक व्यक्त केला. तर सिद्धार्थ यांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्षपाती चौकशी करा अशी मागणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.
घोटाळेबाज उद्योगपती विजय मल्ल्या यानेही सिद्धार्थ यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत सरकारविरोधात निशाणा साधला. भारत सरकार विद्वेषी व निर्दयी असल्याची टीका विजय मल्ल्यानी केली आहे.