सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत तळागाळातील लोकांना एकत्र करून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रातून एकही उमेदवार निवडून येणार नाही, असे भाकीत रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत केले.
वंचितचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकरांशिवाय वंचित आघाडीच्या एकाही उमेदवाराला लाखभर मते मिळणार नाहीत. लोकसभा निवडणूक समोर ठेऊन वंचित आघाडीचे बहुतांश नेते ही सत्तेसाठी वंचित आघाडीत गेले आहेत. पण त्यांचा भ्रमनिरास होणार आहे आणि लोकसभा निवडणुकीनंतर ते सगळे माझ्याजवळ परततील. सोलापूरची जागा महायुतीकडेच राहणार आहे . अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दोन जागी निवडणूक न लढता एका जागी निवडणूक लढवायला हवी होती, असं मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता येणार नाही, असंही ते म्हणाले.
यंदाच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला महाराष्ट्रात ३७ ते ३८ जागा मिळतील. देशात युपीएच्या काही जागा वाढतील, काही कमी होतील. मात्र भाजप २६० पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.